"मनरेगा द्वारे ग्रामविकास ....सखोल मंथन" राज्यस्तरीय सरपंच परिषद संपन्न दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी झाली संपन्न

राज्यस्तरीय सरपंच परिषद- 2020


 "मनरेगा द्वारे ग्रामविकास ....सखोल मंथन" राज्यस्तरीय सरपंच परिषद संपन्न 


 कोरोना संकटात, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हि परिषद ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. 


पुणे:(कारंजा वृत्तकेसरी)


         दि ८ ऑगस्ट २०२० ला स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि विविध सहयोगी संस्थांच्या योगदानाने हि सरपंच परिषद अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. 


परिषदेत सर्वाचे स्वागत आणि प्रस्तावना स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया चे चेअरमन डॉ श्री. प्रशांत खांडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, "सध्या राज्यात आरोग्य बाबत परिस्थिती लक्षात घेता एकत्र येणे शक्य नसतानाही, हि सरपंच परिषद घेऊन त्याचा फायदा ग्रामविकास करण्यासाठी कसा होणार आहे हे सांगितले. जेव्हा आपण सक्षम भारत निर्माण करण्याची भूमिका घेतो, तेव्हा त्याची सुरवात ही गावातूनच होऊ शकते, हे त्याचे मत त्यांनी स्पष्टापणे मांडले. 


सकाळी १० वाजता सुरु झालेल्या या सरपंच परिषदेत तज्ञ मार्गदर्शक पद्मश्री पोपटराव पवार , माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी साहेब, भास्कर पेरे पाटील, भीमराव वराळे- यशदा, एमजीएम विद्यापीठ कुलगुरू सुधीर गव्हाने, आणि मनरेगा अभ्यासक प्रमोद जिंजाळे यांनी मार्गदर्शन केले. पोपटराव पवार साहेबांनी राजकारणापासून दूर राहून पण कसा ग्रामविकास करता येतो, ते सर्वांना स्वतच्या अनुभवातून संगितले तर ग्रामविकास कसा करावा हे दळवी साहेब आणि वराळे साहेब यांनी सर्व उपस्थित प्रतींनिधींना समजावून सांगितले. या परिषदेत ग्रामीण विकासाचे विविध कंगोरे समजून-उमजून विषयांची निवड करण्यात आली असल्याने ग्राम पंचायत प्रश्न, मनरेगा, रोजगार हमी आणि ग्रामविकास तांत्रिकता असे विविध विषय श्रोत्यांना एक नवा विचार देऊन गेले. 


परिषदेत काही अनुभव कथनं सादर झाली. केवळ विचार करून ग्राम विकास होत नाही तर त्यासाठी कृतीपन करावीच लागते हे त्यातून स्पष्टा झाले. सरपंच नाथाभाऊ कदम , सरपंच गौतम ढाणे, सरपंच नरेंद्र पाटील असे प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव व त्यातील येणारे अडथळे पार करून कशा पद्धतीने काम यशस्वी केले हे सर्व उपस्थितांना समजून सांगितल         कार्यक्रम समारोप प्रंसगी आदरणीय श्री. विनायक राऊत , खासदार (लोकसभा गटनेते- शिवसेना पक्ष) यांची उपस्थिती अतिशय महत्वपूर्ण ठरली. कोरोना संकटात, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हि परिषद ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली, याचे त्यांनी कौतुक केले. अशी परिषद, विभागीय स्तरावर स्पार्टबन फेडेरेशन नि आयोजित करावी आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करू हे त्याची आवर्जून सांगितलं. माझा शिक्षण जारी शहरात झाला आसला तरी आज कित्येक वर्षापासून मी गावाशी जुडलो आहे आणि गावाच्या समस्येत नेहमीच पुढाकार घेऊन ती दूर करण्यात प्रयत्न करत असतो. आपण आपल्या परिषदेमधील काही मागण्या, सूचना आम्हाला पाठवा आणि आम्ही लोकप्रतिनिधी त्याचा नक्कीच विचार करू असे आश्वासन पण त्यांनी दिले. 


सरपंच परिषद यशस्वी करण्यासाठी फेडरेशन कोअऱ टिम सदस्य प्रीती काळे व प्रा. निर्मल ठाकूर यांनी सूत्र संचलन आणि मयूर बागूल यांनी आभार प्रदर्शन केले. कपिश कोसळगे आणि प्रशांत कुंभार यांनी सर्व ऑनलाईन सुत्रे समर्थपणे हाताळली. सदरील परिषद घेण्यासाठी सर्व सहयोगी संस्था त्यात भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ, उदयकाळ फाउंडेशन, संपर्क, नवी उमेद, अखिल रयत क्रांतीकरी संघ, महात्मा फुले समाज सेवा मंडळ, व रयत सेवक एजुकेशनल अँड मल्टीपर्पाज सोसायटि यांनी सहकार्य केले. तसेच फेडेरेशनच्या सर्वच कोअऱ टिमचे मोलाचे सहकार्य या परिषदेच्या आयोजनात लाभले आहे.