नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे व मास्क शिवाय बाहेर पडूं नये-- राहुल जाधव उपविभगिय अधिकारी कारंजा
कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी) दि 8
काल एका कोरोना बधिताच्या झालेल्या मृत्यु च्या पार्श्वभूमीवर कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पूरेपुर पालन करुण प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे
कामाशिवाय बाहर निघू नये,बाहेर नियमित मास्क चा वापर करने, सामाजीक अंतराचे पालन करणे,दुचाकी वर डबलसीट वाहन चालवू नये,ऑटो व कार चालकानी फक्त दोनच प्रवासी बसवावे, आदि नियमांचे पालन करुने जरूरी आहे व्यावसाईकानी सुद्धा आपल्या दुकानात किवा दुकाना समोर गर्दी होउ देवू नये
विना मास्क किवा डबल शीट वाहन चालविताना किंवा ऑटो व कार मध्ये 2 पेक्षया जास्त व्यक्ति आढळल्यास 500 रु दंड वसूल करण्याचे आदेश सुद्धा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यानी कारंजा पोलिस प्रशासनाला दिले आहे