स्व अमरनाथजी तिवारी फॉउंडेशन तर्फे आजपासुन अन्नछत्र सुरू
स्वअमरनाथजी तिवारी फाउंडेशन तर्फे रोज संध्याकाळी गरजवंतांना अन्नछत्र 

चे आयोजन

कारंजा  ( संदीप क़ुर्हे )दि 23 एप्रिल


     कोरोना संकट हया साथीच्या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण भारत देशात लॉक डाउन  ची पायरी सुरु असताना याची झळ सर्व सामान्यांना बसत असल्याचे दिसत आहे सर्व मजूर वर्ग घरातच बसून आहे उधोग धंदे बंद पडले आहेत ज्यांची हात कमाइ आहे त्यांच्यावर उपासमारी ची वेळ येवू म्हणून  प्रशासकीय यंत्रणा सरसावली आहे शिवाय अनेक दानशूर व्यक्ति समोर येत आहेत अनेक सामाजिक संघटना मदतीचे हात म्हणून पुढे येत आहेत अशातच ललित तिवारी यांचे वडील जनसामान्यां ची ओळख असलेले नाव स्व. अमरनाथजी तिवारी फाउंडेशन द्वारा फाउंडेशन तर्फे काही कारणानी शहरात अडकलेल्या नागरिका साठी  गरजवंतांना सध्याकाळ च्या वेळेस  अन्नछात्रा चे आयोजन केले आहे  स्व . अमरनाथ तिवारी फाउंडेशन कारंजा तर्फे  अन्नछत्र सुरू करन्यात आले असून गरजु नागरीकांना वाटप करन्यात येत आहे तरी शहरातील नागरीकांनी आपल्या परीसरात जर कुुणी गरजु व्यक्ती असतील तर  त्यांनी फाउंडेशनच्या सदस्यांना माहिती कळवावी किवा 9765011510 / 9822983926 या क्रमाकावर संपर्क साधन्याचे आवाहन ललित तिवारी यानी केले आहे