संचारबंदी काळात विनाकरण दुचाकी फिरवल्यास कारवाही सह   दुचाकी जप्त करण्याचे शहर पोलिस निरीक्षक   सतीश पाटील यांचे निर्देश 


 कारंजा (कारंजा वृत्तकेसरी)


दि.१ - कोरोनाच्या या संकट समयी पोलिस प्रशासन व संपूर्ण यंत्रणा जीवावर उदार होऊन कर्तव्य करीत आहेत, मात्र अनेक नागरिक विनाकारणच रस्त्यावर येऊन अनावश्यक असा ताण निर्माण करीत आहेत. 


 तरी 1 एप्रिल 2020  दुपार पासून जो कोणी रस्त्यावर विनाकारण दुचाकी घेऊन रोडवर दिसून येईल त्याची दुचाकी जप्त करून त्याचेवर कडक कारवाई करण्याचे निर्देश  शहर ठाणेदार सतीश पाटील यांनी सर्व पोलिस कर्मचार्यांना दिले आहे. प्रशासन हे जीवपणाला लावून केवळ व केवळ नागरिकांच्या जिवित्वाचे रक्षणासाठी रस्त्यावर उतरले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे